Bhag 3.3 सुंदर मी होणार

Day
Night

Bhag 3.3 सुंदर मी होणार

Textbook Questions and Answers

कृती

1. खालील कृती करा.

प्रश्न अ.
Maharashtra Board Class 11 Marathi Yuvakbharati Solutions Bhag 3.3 सुंदर मी होणार 1


उत्तर:

प्रश्न आ.
Maharashtra Board Class 11 Marathi Yuvakbharati Solutions Bhag 3.3 सुंदर मी होणार 2
उत्तर:

प्रश्न इ.
महाराजांनी पाठवलेल्या पत्रावर खालील पात्रांच्या प्रतिक्रिया लिहा.

Maharashtra Board Class 11 Marathi Yuvakbharati Solutions Bhag 3.3 सुंदर मी होणार 3
उत्तर:

पात्र

प्रतिक्रिया

1. राजेंद्र

पपांच्या निर्णयाला होकार देण्याच्या स्थितीत आणि बेबीवर डाफरणारा

2. बेबी

पत्र वाचून संताप येतो आणि महाराजांनी ठरवलेल्या निर्णयाचे पालन न करण्याचा निर्णय घेते.

प्रश्न इ.
खालील शब्दसमूहांचा तुम्हांला समजलेला अर्थ स्पष्ट करा.

a. पपांचा पांगुळगाडा.
उत्तर :

पपांचा पांगुळगाडा – पपांनी सांगितलेल्या सर्वच गोष्टींचा मुकाटपणे स्वीकार करणं, त्यात अयोग्य–योग्य काय याचा विचार न करणं.

b. मुलांचे चिमणे विश्व.
उत्तर :

मुलांचे चिमणे विश्व – मुलांचे विश्व हे निरागस असते, लहानसे असते त्यात त्यांचा भोळा भाव सदैव अनुभवायला मिळतो.

c. ब्रेक तुटलेल्या गाडीसारखं आयुष्य.
उत्तर :

ब्रेक तुटलेल्या गाडीसारखं आयुष्य – अर्धमुर्ध आयुष्य जगणं. ब्रेक तुटलेली गाडी ज्याप्रमाणे पूर्णतः टाकून देता येत नाही. तसंच आयुष्यही जगत असतो आणि नसतोही अशी अवस्था.

2. थोडक्यात स्पष्ट करा.

प्रश्न अ.
‘जीवनाच्या त्या प्रकाशात न्हाऊन आता मला सुंदर व्हायचं आहे!’, या दिदीच्या विधानाचा अर्थ.
उत्तर :

आतापर्यंत दिदीने अपंगावस्थेत बरंच दुखणं सहन केलं. ती वडिलांवर प्रेमछाया अंथरत असायची. महाराजही तिच्याजवळ मन मोकळं करायचे. तिचा कवितेचा छंद महाराजांना पसंत नव्हता. कविता करणारा संजय तिला आवडू लागला होता. पण पपांच्या आग्रहाखातर तिने त्याला काही कळवलं नव्हतं, पपांकडून जेव्हा तिला समजतं की पपांनी आईवर कधी प्रेमच नाही केलंय. त्यावेळेस ती व्याकूळ झाली. प्रेम नसताना चार मुलं झाली. ती मोठी झाली.

ममीने महाराजांच्या भीतीपायी घर सांभाळलं. ती मुलांना जन्म देऊन गेली. पण डॉक्टरांना मुलांची आई व्हायला सांगितलं. डॉक्टरांनी आपल्या प्रेमाचा त्याग केला आणि मुलांना सांभाळलं पण त्या डॉक्टरांनाही महाराजांनी निघून जायला सांगितलं. आपले पपा इतके कसे कठोर वागू शकतात? इतके निष्ठूर कसे होऊ शकतात. या विचारांनी व्याकूळ झालेली दिदी घराबाहेर पडण्याचा निर्णय घेते. तिलाही जीवन समरसतेने जगायचंय.

ते जगण्यासाठी ती आसुसली आहे. आजवर तिनं घराबाहेरही पाऊल टाकलेलं नाही त्यामुळे तिला आता जीवनाचा आनंद उपभोगायचा आहे. त्या प्रकाशात न्हाऊन तिचं जीवन सुंदर करायचं आहे.

प्रश्न आ.
महाराज आणि बेबी यांच्या विचारातील संघर्ष.
उत्तर:

खालसा झालेल्या संस्थानाच्या संस्थानिक महाराजांना आपल्या संस्थानिक असल्याचा प्रचंड अभिमान होता. सत्ताधीश म्हणून वावरल्याने त्यांचा अहंकार पराकोटीला पोहोचला होता. पिता म्हणून वागताना आपल्याला आपल्या मुलांचे सुख पहायला हवं हे कधी त्यांच्या लक्षातच आले नाही.

नेहमी हुकमी एक्का आपल्या हातात असल्यासारखे आपल्या आप्तजन, प्रजाजनांवर आसूड ओढणं अशी वृत्ती असल्यामुळे ही प्रेम, माया, जिव्हाळा या भावनांपासून पार दूर गेलेली असते. बेबीचा नेमका या गोष्टीबद्दलच राग आपल्या पित्यावर होता. तिला मुक्तपणे जगायचं होतं.

जीवनाचा आनंद घेत घेत प्रकाशाकडे जायचं होतं. पित्याची जाचक बंधनं तिची घुसमट करत होती.त्याला हरक्षणी ती विरोध करत होती. तिच्या वडिलांविरुद्ध बंड करण्याचे बळ तिच्यात होते कारण ती त्यांच्या विचारांची गुलाम नव्हती.

प्रश्न इ.
नाट्यउताऱ्यातील ‘डॉक्टर’ या पात्राची भूमिका.
उत्तर :

डॉक्टर हे एक समंजस मातृहृदयी असं पात्र आहे. आपल्या प्रेमाचा त्याग करून महाराजांनी केलेल्या अनेक अपमानांना सहन करून डॉक्टर महाराजांजवळ राहिले. महाराणींनी मृत्यूपूर्वी आपल्या मुलांची जबाबदारी त्यांच्यावर सोपवली ती त्यांनी अगदी निष्ठेने सांभाळली. आपल्या या अपत्यांचा सांभाळ करता करता त्यांनी स्वत:च्या अनेक इच्छांचा त्याग केला. त्याबद्दल कोणतीही तक्रारही त्यांच्या मनात नाही. त्यांना महाराजांनी प्रचंड त्रास दिला आहे. पण तरी हसतमुखाने मुलांना प्रेम देण्यात त्यांनी कसूर केली नाही.

मुले मोठी झाली, संस्थान बरखास्तच झालेलं आहे. अशा अवस्थेत महाराज त्यांना आपल्या सेवेतून मुक्त करतात. खरं तर त्यांना या वयात मुलांचा आधार हवा असतो त्याच काळात मुलांपासून, राज्यापासून ते त्यांना दूर करतात. सहनशील, प्रेमळ, त्यागी असं हे व्यक्तिमत्त्व आहे.

3. स्वमत.

प्रश्न अ.
तुम्हांला समजलेली ‘ममी’ ही भूमिका नाट्यउताऱ्याच्या आधारे स्पष्ट करा.
उत्तर :

‘सुंदर मी होणार’ हे नाटक जीवनाचा सुंदरतेने विचार करायला लावणारी कलाकृती आहे. स्वातंत्र्यपूर्व काळात काही संस्थाने होती. ती काळाच्या ओघात संपुष्टात आली तरी तिथल्या संस्थानिकांच्या मनात असलेली राजेशाही, हुकुमशाही संपुष्टात आली नाही. त्यातील एका सत्ताधीशाची कहाणी ‘सुंदर मी होणार’ मध्ये येते. यातील महाराजही शिस्तीचे भोक्ते असलेले.राणी त्यांच्या प्रेमाला आतुर असलेली. पण राजाचे तिच्यावर प्रेमच नसते.

दिदीचा जन्म झाल्यावर तर ती केवळ त्यांच्या सुखाकरता महालात रहात असते. आपल्या नवऱ्यावर आपलं प्रेम असावं इतकीच माफक मागणी असताना महाराज मात्र तिच्यावर प्रेम करू शकत नाहीत याचं वैषम्य तिला वाटत असतं. याचा परिणाम तिच्या प्रकृतीवर होतो आणि ती कायमची आजारी पडते. नवऱ्याच्या प्रेमासाठी आसुसलेली स्त्री आणि मुलांना मायेची ऊब देऊ न शकणारी स्त्रीची अगतिकता या नाटकातील ममी या पात्राद्वारे दिसून येते.

प्रश्न आ.
रंगसूचना कथानकातील दुवे कसे जोडतात ते स्पष्ट करा.
उत्तर :
नाटकामध्ये रंगसूचनेला संवाद, प्रसंग घटना यांच्याइतकेच महत्त्व आहे. रंगसूचनेमुळे त्या त्या संवादामागील हावभाव वाचणाऱ्याला कळतो.

नाटककाराने या अशा रंगसूचना पात्राने कोणत्या गोष्टी वा कृती त्यावेळेस कराव्यात त्याकरता सांगितलेल्या असतात. उदाहरणार्थ – (पत्र वाच लागते – तिचा चेहरा एकदम उतरतो. थकल्यासारखी नेहमीच्या खुर्चीवर येऊन बसते) (पाठ्यपुस्तक पृष्ठ क्र. ८०) इथे दिदीने कसे वागावे, भाव दाखवावे हे सांगितले आहे.

या अशा रंगसूचना पात्रांच्या आविर्भावासाठी जशा महत्त्वाच्या तशा कथानकातील दुवे साधण्याकरताही महत्त्वाच्या असतात. त्या त्या वेळेची पात्राच्या मनातील भावना अधोरेखित होते त्यामुळे त्या प्रसंगाचा, घटनांचा भाव आपल्याला वाचून समजतो उदा. (आवेगानं – मागल्या बाजूचा पडदा बाजूला करतात – तिथे महाराज उभे असतात. सर्वांना आश्चर्य वाटतं)(पाठ्यपुस्तक पृष्ठ क्र. ८२) (मागाहून नोकर फळे घेऊन येतो) – त्याला नुसत्या इशाऱ्याने ती टेबलावर ठेव असे सांगतात, तो ठेवून जातो. (पाठ्यपुस्तक पृष्ठ क्र. ८२) (तिला कडकडून भेटते – अत्यंत तुच्छतेने आपल्या बापाकडे पाहते आणि निघून जाते) (पाठ्यपुस्तक पृष्ठ क्र.८३) या अशा प्रकारच्या रंगसूचनांमुळे ते पात्र, घटना, कथानक समजायला मदत होते.

4. अभिव्यक्ती.

प्रश्न अ.
राजवाडा आणि नंदनवाडी यांच्यातील अंतर दूर होण्यासाठी त्या काळाचा विचार करून उपाय सूचवा.
उत्तर :

महाराज हे सत्ताधीशाप्रमाणे वागत होते. त्यामुळे सर्वच जण त्यांच्या पदाचा, प्रतिष्ठेचा मान राखून बोलत असत. राजांना विरोध करण्याची कोणाची तयारी नसायची. पण हे झालं राजवाड्यात. राजाने राजवाड्यात त्यांचा मान–सन्मान याला शोभेल असंच वागावं पण घरी मात्र पित्यासारखं वागायला हवं.

नंदनवाडीचं नावच किती सुंदर आहे. जिथे नंदनवनच असायला हवं. पण महाराजांच्या शिस्तबद्ध, हेकेखोर स्वभावामुळे घर, घरातील माणसं सुंदर असूनही तिथं नंदनवन फुललं नाही. याकरता जर महाराणीने पुढाकार घेऊन राजांना विरोध केला असता तर वातावरण बदलले असते. स्त्रीहट्ट आणि बालहट्ट यांचा वापर राणींनी केला असता तर राजामध्ये थोडातरी बदल झाला असता.

प्रश्न आ.
नाट्यउताऱ्याद्वारे तुम्हांला समजलेला ‘सुंदर’ या शब्दाचा अर्थ स्पष्ट करा.
उत्तर :

‘सुंदर मी होणार’ या नाट्यउताऱ्यातून एका राजाच्या शिस्तप्रिय, अहंकारामुळे एक घर कसे तुटते अशा आशयाचे कथानक आले आहे. राजाच्या अशा वर्तनाने त्याची राणी आजारी पडते. ती राजाकडून प्रेमाची अपेक्षा करू शकत नाही. राजालाही तिच्याबद्दल फक्त काळजी असते. प्रेम, माया नाही त्यामुळे दोघांचे नाते रुक्ष झालेले आहे. त्या रुक्ष नात्याचे पडसाद मुलांवरही होतात. दिदीच्या पायात अशक्तपणा हा याचाच परिणाम आहे. डॉक्टर ममत्वाने मुलांना वाढवतात पण तरीही त्यांच्यावर महाराजांची बंधने असतात. जीवन हे सुंदर असले पाहिजे. जीवन एकदाच मिळतं.

ते सार्थकी लावणं, त्यात आपल्या जीवनाचा पुरेपूर आनंद मिळवणं हे आपल्या हातात आहे. पण या नंदनवाडीतील कोणीतीही व्यक्ती मुक्तपणे, आनंदाने जगत नाही. जगणं सुंदर असू शकतं हे तिथल्या कोणालाही ठाऊक नाही. एका दबावाखाली, ताणाखाली सर्वच जण जगत आहेत. त्यामुळेच या सर्व ताणातून बाहेर पडण्यासाठी प्रत्येकजण आपल्या जगण्याचा मार्ग निवडायला लागतो. दिदी आपलं पायाचं दुखणं घेऊन जगत असते.

तर बेबी वडिलांविरुद्ध बंड करायला पुढे सरसावते. घर सोडायचीदेखील तिची तयारी असते. वडिलांच्या सर्व आज्ञांचे पालन करण्यात धन्यता मानणारे प्रताप, राजेद्र हे ही नंतरच्या काळात आवाज करतील. वडिलांच्या जाचाला शिस्तीला कंटाळून दिदीसुद्धा घर सोडायचा निर्धार करते. आजवर महालाबाहेर ती पडलेली नाही त्यामुळे ती बाहेरचं जग अनुभवण्याकरता उत्सुक आहे. वडिलांचे आपल्या आईवर प्रेम नसताना त्यांनी संसार केला, मुले झाली हे ऐकल्यावर तिला प्रचंड त्रास होतो. आपल्या आईवडीलांमध्ये प्रेमच नव्हतं तरी ते जगले? याचा विस्मय तिला वाटतो.

जगणं प्रकाशमय असावं, सुंदर असावं असं तिलाही वाटतं. तिच्या काव्यावर, तिच्यावर प्रेम करणारी व्यक्ती तिच्या आयुष्यात आहे याचा आनंद घेऊन तिचं जगणं सुंदर करायचं आहे.

प्रश्न इ.
प्रस्तुत नाट्यउताऱ्यावरून पु. ल. देशपांडे यांच्या संवादलेखनाची वैशिष्ट्ये लिहा.
उत्तर :

‘सुंदर मी होणार’ या नाटकातील नाट्यउताऱ्याचा अभ्यास करताना पु. ल. देशपांडे यांनी खूप सहजतेने हे नाट्य संवाद लिहिलेत असं जाणवतं.

त्यात माणसाच्या नेहमीच्या वापरातले शब्दही आले आहेत. तसंच या संवादात एक काव्यात्म भावही आढळतो. ‘प्रकाशांच्या लेकरांना या अंधारकोठडीत त्यानं जन्माला घातलं’ अशा प्रकारच्या संवादातून त्यातील काव्य जाणवतं.

Additional Important Questions and Answers

कृती : १ आकलन कती

खालील उतारा वाचून सूचनेनुसार कृती करा.

कृती – १.

प्रश्न 1.
आकृतिबंध पूर्ण करा.
उत्तर :

(अ) दिदीला राजवाडा असा वाटतो – [अमंगल]
(आ) दिदीला कलावंत म्हणून आदरणीय असलेली व्यक्ती – [संजय]
(इ) दिदी महाराजांसोबत काय म्हणून राहणार होती – [आई]

कृती – २.

प्रश्न अ.

(a) गटात न बसणारा शब्द ओळखा.
उत्तर :

घर सोडून जाणाऱ्या व्यक्ती (बेबी, प्रताप, राजू, दिदी) – [बेबी]

(b) योग्य पर्याय निवडा :
उत्तर :

थेंबभर पाण्यालादेखील याची ओढ असते.

पर्याय :

  • विशाल समुद्राची
  • अथांग नदीची
  • आकाशातील मेघांची [विशाल समुद्राची]

काय ऐकायचं तुमचं ……………………………………….. दिदी : संजय माझ्या उत्तराची वाट पाहत असतील. (पाठ्यपुस्तक पृष्ठ क्र.८५)

प्रश्न आ.
महाराज संजयकडे या दृष्टीने पाहतात.
पर्यायः

(a) उनाड इसम
(b) कलावंत
(c) दिदीचा प्रियकर
उत्तर :
(a) उनाड इसम

(a) खालील शब्दांपासून अर्थपूर्ण शब्द बनवा.
उत्तर :

अंधारकोठडी – अंधार, अंडी, कोठडी, कोडी, कोर, धार
वातावरण – वर, वण, वाव, वाण, वार, रण, रव, रवा, तार, ताव, ताण, तारण, वरण, वावर

(b) खालील वाक्यातील काळ ओळखा.
मग तुम्ही एकटे एकटे राहाल.
उत्तरः

भविष्यकाळ.

(c) खालील वाक्यातील अव्यय ओळखा.
माझ्यासारखी दुबळी मुलगी सुद्धा त्याच विशाल जीवनाकडे निघाली आहे.
उत्तरः

कडे – शब्दयोगी अव्यय.

स्वमत:
प्रश्न 1.
‘थेंबभर, पाण्यालादेखील शेवटी विशाल समुद्राचीच ओढ असते’ या वाक्याचा तुम्हांला जाणवलेला अर्थ लिहा.
उत्तर :

सुंदर होण्यासाठी पहिल्यांदा आपल्या मनाची तयारी पाहिजे. आयुष्यातील छोट्या छोट्या गोष्टींनी आपल्याला आनंद मिळाला की जीवनाचा सागर सुंदररित्या जगता येतो. आकाशातून पडणाऱ्या पावसाच्या थेंबांनाही समुद्राकडे जाण्याची ओढ असते. ते झरा, नदी, नाले या सर्वांमार्फत समुद्रापर्यंत प्रवास करतात. कोणतीही व्यक्ती आहे त्या ठिकाणी राहिली तर तिचा विकास अशक्य असतो.

म्हणून जे उदात्त आहे उत्तम आहे याकरता आपण प्रयत्नशील राहिलं पाहिजे. मनानं, शरीरानं कमकुवत असलेल्या दिदीला असलेला कवितेचा छंद तिच्या मनाला उभारी देतो. तिच्या कविता ज्यांना आवडतात तो संजयही कलावंत आहे. तो तिच्या प्रेमाचा स्वीकार करण्यासाठी उत्सुक आहे. पण पपांच्या काळजीखातर दिदीने त्याला उत्तर दिलेलं नाही. पपांचे आपल्या ममीवर प्रेम नव्हते हे ऐकल्यावर दिदीला प्रचंड वाईट वाटते.

आपल्या पपांचा तिला तिरस्कार वाटू लागतो आणि ती संजयला होकार दयायचा निर्णय घेते हा विचार मला फार सकारात्मक वाटतो. यामुळे तिच्या जीवनात उभारी येईल आणि तिचं जीवन सुंदरही होईल.

प्रश्न 2.
महाराजांविषयी दिदीला वाटणाऱ्या घृणेबद्दल तुमचे मत स्पष्ट करा.
उत्तर :

महाराजांची सर्वात जवळची मुलगी दिदी आहे. दिदीजवळ ते आपल्या मनातलं दुःख सांगत असतात. पण एकाक्षणी जेव्हा ते दिदीजवळ कबूल करतात की त्यांचे दिदीशिवाय दुसऱ्या कोणावरच प्रेम नाही. दिदीच्या जन्मदात्या ममीवरही त्यांचं प्रेम नाही हे ऐकताच दिदीला आपल्या आईविषयी प्रचंड वाईट वाटतं. आपली आई भीतीखातर आपल्या पपांसोबत राहिली. पपांचे प्रेम तिच्या वाट्याला, भावाबहिणींच्या वाट्याला आलं नाही हे वास्तव दिदीला पचवणं कठीण होतं. आपल्या पपांनी आपल्या ममीवर प्रेमही करू नये? मुलांची जबाबदारी तिहाईत डॉक्टरवर देण्याइतमत पपा आईपासून दूर गेलेले होते.

मग प्रेमसंबंध नसतानाही पपा–ममी केवळ पती–पत्नी या नात्यात केवळ सोय म्हणून एकत्र बांधले गेले? हा विचार दिदीला त्रासदायक वाटू लागला. त्यामुळे तो राजवाडा, त्यातील मालकी हक्क या सर्वांविषयी दिदीला तिरस्कार वाटला तर ते चुकीचं नाही. कोणतंही नातं प्रेमाने जास्त काळ टिकू शकतं. पण तिथे भीती, दहशत असेल तर ते नातं घृणेकडे वळतं त्यामुळे मनात कोणतीही प्रिती नसेल तर तिरस्कार, अलिप्तता या नकारात्मक गोष्टींची वाढ होते. दिदीच्या मनात नेमकं हेच द्वंद्व चालू होतं. प्रेमाचा अंकुर नसलेल्या व्यक्तीवर ती प्रेम कशी करू शकते?

सुंदर मी होणार प्रस्तावनाः

लेखक पु.ल.देशपांडे हे मराठी साहित्याविश्वातील चतु:रस्त्र व्यक्तिमत्त्व होय. विनोदी लेखक, नाटककार, प्रवासवर्णनकार म्हणून प्रसिद्ध. मार्मिक आणि निर्मळ विनोद, सूक्ष्म निरीक्षण, भाषेचा कल्पक आणि चमत्कृतीपूर्ण वापर करण्याचे कौशल्य ही त्यांच्या लेखनाची बलस्थाने होत. ‘तुझे आहे तुजपाशी’, ‘ती फुलराणी’, ‘अंमलदार’ ही नाटके’, ‘सदू आणि दादू’ ‘असा मी असामी’ यांसारख्या एकांकिका, ‘हसवणूक’, ‘बटाट्याची चाळ’, इत्यादी विनोदी लेखसंग्रह तर ‘अपूर्वाई आणि पूर्वरंग’ इत्यादी ‘प्रवासवर्णने’, ‘व्यक्ती आणि वल्ली’, ‘गणगोत’ यांसारखी व्यक्तिचित्रणात्मक पुस्तके अशी विपुल ग्रंथसंपदा आहे. ‘व्यक्ती आणि वल्ली’ या व्यक्तिचित्रणात्मक पुस्तकाला साहित्य अकादमी पुरस्कार, भारत सरकारकडून ‘पद्मभूषण’ या पुरस्काराने सन्मानित.

सुंदर मी होणार पाठाचा परिचयः

स्वातंत्र्यानंतर संस्थानं भारतात विलीन झाल्यानंतरचा काळ. नंदनवाडीच्या संस्थानिकांचा भव्य राजवाडा अजूनही जुन्या काळाची अदब अन् मुजरे सांभाळत बसलाय. महाराजांची थोरली मुलगी दीदीराजे गेली १० वर्षे खुर्चीला खिळून बसलीय. संस्थानाचे खास डॉक्टर तिच्यावर औषधोपचार करत आहेत. राजेंद्र, प्रसाद आणि बेबीराजे ही तिची भावंडं.

१०वर्षांच्या पांगळेपणामुळे खुर्चीला जखडलेल्या दीदीला आपण बरं होण्याची आशाच उरलेली नाही. २६–२७ वर्षांच्या त्या तरुणीला मृत्यूच आपली सुटका करील, असं खात्रीनं वाटू लागलंय. कवी गोविंदांच्या ‘मृत्यू म्हणजे वसंत माझा’ यांसारख्या कविता तिला आवडू लागल्यात. ती स्वतः संदर कविता रचते. निसर्गाच्या सौंदर्याच्या दर्शनाला पारखी झालेली दीदी कित्येक वर्षांपूर्वी तिच्या आईनं संस्थानातल्या लोकांसमवेत केलेल्या दीपदानाच्या रम्य सोहळ्याची स्मृती डोळ्यांपुढे आणते. पावसानं दुथडी भरून वाहणाऱ्या कल्याणी नदीचं पाहून आलेलं दृश्य बेबी स्वत:च्या कल्पनेनं अनुभवू लागते.

दिदी तर अधू; पण त्या वाड्यातल्या कुणालाच त्या चार अवाढव्य भिंतींच्या बाहेर जाता येत नाही. संस्थानाची अमर्याद सत्ता गमावलेल्या महाराजांचा कडकपणा वाढलाय. आपल्या राज्यात घोड्यांचा लगाम धरून अदबीनं उभं राहणाऱ्या मोतदाराचा मुलगा बंडा सांवत निवडणूक लढवून असेम्ब्लीचा सदस्य बनलाय, हे महाराजांना सहन होत नाही. लोकशाहीच्या नावानं सामान्य माणसाच्या हाती सत्ता जावी, हे त्यांना मंजूर होत नाही.

योगायोग असा, की याच बंडा सावंतवर धाकट्या मुलीचं–बेबीचं प्रेम आहे; पण महाराजांना तो व्यभिचार वाटतो. तिकडे दीदीच्या कविता आवडलेला एक कवी – संजय देशमुख – एकदा तिला भेटायला वाड्यात येतो. तिच्या नकळत तिच्या कविता बेबीनं कवीला पाठवलेल्या असतात. कुणावरती प्रेम केलं, तर उत्कटतेनं करावं. असं कवीचं तत्त्व. खुर्चीला खिळलेल्या दीदीवर तो मनापासून प्रेम करतो; पण तो तिथं आलाय हे कळताच महाराज येतात आणि त्याला हाकलून लावतात. त्यांचा हुकूम ऐकताच एकाएकी अवसान येऊन दिदी खुर्चीतून उठते, उभी राहते. ‘जुनी इंद्रिये, जुना पिसारा, सर्व सर्व झडणार, सुंदर मी होणार’ असं काव्य तिला स्फुरतं.

दिदी आता चालण्याचा सराव करते; पण बरी होत आहे, हे महाराजांना मान्य होत नाही. दरम्यान, त्यांची पुतणी – एका लक्षाधीशाबरोबर लग्न केलेली – भेटीला येते. तिचा नवरा सुरेश हा सुरांच्या आनंदात डुंबणारा; पण बाथटबमध्ये बसल्यासारखं घराच्या उंच भिंतींच्या आत गीतांचा आनंद घेण्याची त्याला आवड. निरनिराळे राग आळवीत तो ‘आसावरी’ रागाशी दीदीची तुलना करतो.

महाराजांचा कठोरपणा वाढत जातोय. ते मुंबईला गेलेले असतात. तिथून पत्र पाठवून इंग्लंडला जाऊन दीदीवर उपचार करण्याचा बेत प्रकट करतात. त्या वेळी मुलांची आई – संस्थानची राणी मृत्युपंथाला लागलेली असताना तिच्या काळजीपोटी स्वत:चं ठरलेलं लग्न रद्द करून आयुष्यभर मुलांची आई होऊन राहण्याचं व्रत घेतलेले डॉक्टर आत्मकहाणी सांगतात.

इतरांच्या बाबतीत कठोर असणारे आपले वडील आपल्यावर प्रेम कसे करतात याचं दीदीला आश्चर्य वाटत असतं; पण एकेक करून भावंडं आणि डॉक्टर वाडा सोडून जाऊ लागतात आणि आपल्या आईवरचं प्रेम नाहीसं झाल्यावर तिला ही मुलं झाली, हे कळताच वडिलांच्या कठोर मनाची चीड येते.

दिदीला पाहिल्यावर सुरांच्या मागून जाण्यासाठी घराच्या भिंतीबाहेर पडणारा सुरेश पुन्हा एकदा सपत्नीक भेटायला येतो. आता सुरेशरूपी सुरवंटाचं फुलपाखरू झालेलं असतं. तो मुक्तपणे गाऊ लागतो. ते स्वर कानी पडल्यानं संतापलेले महाराज येऊन त्याला हाकलून लावतात.

आता मात्र महाराजांच्या या हुकूमशाही आणि हृदयशून्य वागणुकीची चीड येऊन संपूर्ण आयुष्य वडिलांच्या सुखासाठी त्यांच्या सोबत घालवण्याचं ठरवलेली दिदी वाड्याबाहेर पडते. तिच्या पावलांत बळ आलेलं असतं. तिला नवे पंख फुटलेले असतात.

सुंदर मी होणार समानार्थी शब्द/पर्यायी शब्द :

पांगुळगाडा – पांगळ्या मुलाला चालायला शिकवण्यासाठी तयार केलेली तीन चाकी गाडी (a young child’s go-cart) आजन्म – जन्मापासून, जन्मभर (throughout the life) विटंबना – अप्रतिष्ठा (ridicule, mockery) आपत्ती – संकट (bad times, distress) तिटकारा – तिरस्कार, कंटाळा (dislike, disgust), गुच्छ – फुलांची एकत्र केलेली जुडी (a cluster, a bouquet of flowers), स्तब्ध – स्थिर, शांत (silent, quiet) प्रयोजन – हेतू, कारण (motive, purpose) पाठिंबा – आधार (support) अपराध – गुन्हा (crime) संगोपन – जोपासना (careful preservation) मातेदार – घोडा सांभाळणारा (groom), उनाड – निरुदयोगी (truant, vagabond).